भारतीय नेमबाजपटूंची सुवर्ण कामगिरी   

शांघाई : भारतीय तिरंदाजांनी शनिवारी शांघाई येथे सुरु असलेल्या तिरंदाजी विश्वचषकातील दुसर्‍या पर्वात सुवर्ण कामगिरी केली. यामध्ये सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांचा समावेश आहे. भारतीय पुरुष कपाउंड नेमबाजी स्पर्धेत अभिषेक वर्मा, ओजस देवतळे, आणि रिषभ यादव यांची सर्वोत्तम कामगिरी ठरली. भारतीय संघाने मॅक्सिकोच्या संघाला २३२-२२८ अशा फराकाने पराभूत केले. तर महिला नेमबाजपटूंनी रौप्य पदकाची कामगिरी केली. महिलांना अंतिम सामन्यात मॅक्सिकोकडून पराभव स्वीकारावा लागला. महिला संघात ज्योती सुरेखा वेन्नम, मधुरा धामणगावकर आणि चिकिता तानिपार्थी यांचा समावेश आहे. मॅक्सिकोच्या संघाने २३४-२२१ असे वर्चस्व मिळविले. मिश्र तिरंदाजीत भारतीय नेमबाजपटूंनी तिसरा क्रमांक मिळवत कांस्य पदक मिळविले. 

Related Articles